आंतररष्ट्रीयउद्योग विश्वमहाराष्ट्र

टाटा उद्योजक रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली

ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते

Spread the love

मुंबई (लोकजागृती ):ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ब्रीच कँडी रुग्णालयातीलब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेटाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचारचालू होते.काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.टाटांनी देशासाठी दिलेलं योगदान मोलाचं आहे.

संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला. टाटा आयुष्यभर साधेपणानं जगले. टाटा समूहानं कोणताही उद्योग सुरु करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचं काम त्यांनी केलं. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धारानं उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके होते आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button